विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच आहारातील त्यांचे महत्त्व समजावे ,विद्यार्थ्यांनी पालेभाज्या ,रानभाज्या खाव्यात यासाठी आज कोलगाव जिल्हा परिषद शाळा नंबर १ मध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री हा शालेय उपक्रम पार पडला..

विद्यार्थ्यांना आहारातील भाजीचे महत्व कळावे हा मुख्य उद्देश उपक्रमाचा पाहायला मिळाला.तसेच विद्यार्थ्यांना स्वतः विक्रीचे ज्ञान व्हावे ,हस्तकौशल्य विकासातून राखी तयार करणे व स्व कमाई करणे हा स्काऊट/गाईड यांचा एक उपक्रम सुद्धा आज शाळेत राबविला गेला.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.प्रसाद नाईक,माजी मुख्याध्यापक -श्री .कारीवडेकर ,मुख्याध्यापिका श्रीम.मृगाली पालव,सहशिक्षिका श्रीम .सृष्टी पाटील,श्रीम.मेघा सावंत, श्रीम.अनिता कतगर ,पत्रकार रंजित गोविंद जाधव, स्वयंपाकी ,मदतनीस ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!