मोती तलावामध्ये उडी टाकलेल्या युवकाचा मृतदेह सापडला होता. मात्र युवतीचा मृतदेह सापडत नव्हता. यासाठी बाबल आल्मेडा रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते. पाण्यातील कॅमेराच्या साहाय्याने शोध घेतला असता आतील गाळामुळे मृतदेह दिसू शकला नाही. मात्र रेस्क्यू टीमधील युवकांनी तलावात उतरत शोध घेत मृतदेह शोधला. बऱ्याच कालावधीनंतर शेवटी मृतदेह हाती लागला. अचानक घडलेल्या या घटनेने खळबळ उडवून दिलीच. मात्र सर्वत्र या प्रकाराने हळहळ व्यक्त केली जात आहे..