युवांना सामाजिक कार्याचे भान राहावे यासाठी जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेतून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. रक्तदान महाकुंभ, अवयव दान, देहदान, मोफत गाडी शिकवण, वृक्षारोपण, महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे, अश्या विविध सामाजिक उपक्रमातून सामाजिक ऐक्य साधले जाते.

युवांनी एकत्र येऊन समाजाच्या जडण घडणीत हातभार लावावा यासाठी जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य जी हे युवांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. आजची तरुण पिढी हे उद्याच भविष्य असल्याने त्यांनी योग्य त्या मार्गाने मार्गक्रमण केले पाहिजे हा त्यांचा नेहमीच अट्टाहास राहिला आहे.

रामानंदाचार्य संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्यावतीने टर्फ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा कोलगाव येथील तनुष स्पोर्ट्स येथे घेण्यात आली होती. या स्पर्धेला संपूर्ण जिल्ह्यातून १०० च्या आसपास युवा हजर होते. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचा मालवण तालुका जेता तर देवगड तालुका उपविजेता ठरला.मान्यवरांच्या हस्ते वैयक्तिक आणि सांघिक बक्षीस प्रदान करण्यात आली.संपूर्ण स्पर्धेत सांप्रदायिक शिस्त दाखवत युवांनी चांगल्या खेळ भावनेने खेळ खेळला. या स्पर्धेला संपूर्ण जिल्हा कमिटी, तालुका कमिटी, महिला सेना, यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!