जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेतून रामानंद संप्रदायाच्यावतीने संपूर्ण भारतभर दिनांक 5 जुलै ते १९ जुलै या दरम्यान वृक्षारोपण महाअभियान राबविण्यात येत आहे. वृक्षारोपण केल्याने पावसाचे प्रमाण वाढते, त्याचप्रमाणे ग्लोबल वार्मिंग चा धोखा देखील कमी होतो, वृक्षामुळे ऑक्सिजन वायुचे प्रमाण वाढून, कार्बन डाय-ऑक्साइड वायुचे प्रमाण कमी होईल, पर्यावरण संतुलित राहील हा संदेश वृक्षारोपण महाअभियान द्वारे संपूर्ण देशाला दिला जात आहे.

रामानंद संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्यावतीने देखील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये वृक्षारोपण महाअभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत मालवण तालुक्यामध्ये वृक्षारोपण राबविण्यात आले. यावेळी १८० वृक्ष लागवड करण्यात आली.यावेळी मालवण तालुका प्रमुख भुषण मुंबरकर,जिल्हा ॲम्ब्युलन्स प्रमुख दिनेश मुंबरकर,जिल्हा सचिव महेश तांडेल, जिल्हा कर्नल प्रमुख भरत लाड,तालुका युवा प्रमुख दिपेश मुणगेकर,तालुका ब्लड कॅम्प प्रमुख दुर्गेश परब, तालुका आध्यात्मिक प्रमुख भाग्यश्री डीचवलकर,तालुका सचिव गणेश पेडणेकर,मालवण सेवाकेंद्र अध्यक्ष प्रदीप मुंबरकर आदि पदाधिकारी आणि भक्तगण उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!