वेंगुर्ला: शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून आज मनिष दळवी यांच्याकडे पाहिले जाते. त्याची झलक त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीत दाखवून दिली होती. आता ते पुन्हा एकदा सज्ज झालेत ते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी. आज त्यांनी आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जनतेचा त्यांना प्रतिसाद वाढत आहे.
